मुंबईतील जैन मंदिर पाडल्यावर जैन समाजाची संतप्त प्रतिक्रिया; वर्षा गायकवाड यांची सरकारवर टीका मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईमुळे जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे. दोन दिवसांपूर्वी मनपाने हे ऐतिहासिक मंदिर पाडल्याने, जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी जैन बांधवांनी रस्त्यावर उतरून शांततेने रॅली काढली. या आंदोलनात मोठ्या संख्येने जैन समाजातील नागरिक सहभागी झाले होते.
राजकारण

मुंबईतील जैन मंदिर पाडल्यावर जैन समाजाची संतप्त प्रतिक्रिया; वर्षा गायकवाड यांची सरकारवर टीका