‘लाडकी बहीण’ योजनेवरून जितेंद्र आव्हाड आक्रमक, सरकारला थेट इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “खोटी आश्वासनं देऊन आता पळ कशाला काढता?” असा सवाल करत त्यांनी सरकारवर टीका केली.

‘लाडकी बहीण’ योजनेवरून जितेंद्र आव्हाड आक्रमक, सरकारला थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “खोटी आश्वासनं देऊन आता पळ कशाला काढता?” असा सवाल करत त्यांनी सरकारवर टीका केली.

मंत्रालयात घुसण्याचा इशारा

जर या योजनेतून महिलांची नावे कमी करण्यात आली, तर आम्ही महिलांना घेऊन मंत्रालयात घुसू, मंत्री आणि सरकारचे जगणे मुश्कील करू, असा थेट इशारा आव्हाड यांनी दिला.

‘सुप्रीम कोर्टाच्या निकालावर शिक्कामोर्तब’

आव्हाड यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा संदर्भ देत म्हटले, “निवडणुकीपूर्वी महिलांना पैसे देऊन मतांसाठी लाच दिली. आता नावे काढली, तर सुप्रीम कोर्टाने जे सांगितले तेच सिद्ध होईल.”

सरकारवर प्रखर टीका

सरकारने महिलांना आकर्षक आश्वासनं देऊन सत्ता मिळवली, आणि आता त्यांना योजनेंतून वगळत आहे, असा आरोप करत आव्हाड म्हणाले, “महिला घरी नाही जाणार, आम्ही त्यांना मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये बसवू.”

आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top