उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारकडे मागणी : “शिवजयंतीला देशव्यापी सुट्टी द्या”

नाशिकमध्ये शिवसेना (ठाकरे गट) आयोजित ‘निर्धार शिबिरा’मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मागणी मांडली – देशभरात शिवजयंतीला अधिकृत सुट्टी घोषित करण्यात यावी.

उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारकडे मागणी : “शिवजयंतीला देशव्यापी सुट्टी द्या” नाशिकमध्ये शिवसेना (ठाकरे गट) आयोजित ‘निर्धार शिबिरा’मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मागणी मांडली – देशभरात शिवजयंतीला अधिकृत सुट्टी घोषित करण्यात यावी.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिवरायांबद्दलचा अभिमान व्यक्त करत म्हटले की, “शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत, तर त्यांचा गौरव संपूर्ण देशाने करायला हवा. त्यांच्या जयंतीला देशभर सुट्टी जाहीर केली गेली पाहिजे.”

त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना माफ करता कामा नये. “या देशात जर खऱ्या अर्थाने शिवशाही हवी असेल, तर शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर करणे आवश्यक आहे. केवळ राजकीय भाषणांत ‘शिवाजी महाराज की जय’ म्हणणे पुरेसे नाही,” असे ते म्हणाले.

आपल्या भाषणात त्यांनी सत्तेच्या राजकारणावरही टीका केली. “सत्ता असो वा नसो, लोकांचा पाठिंबा महत्वाचा असतो. मी भाग्यवान आहे की, माझ्यासोबत विचाराने तापलेले आणि शिवरायांच्या परंपरेचे वारसदार असलेले लोक आहेत,” असे म्हणत त्यांनी शिवसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

भाषणात त्यांनी इतिहासातील काही प्रसंगांची आठवण करून दिली. “संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणूस किती पिसाळला होता याची जाणीव तेव्हाही सत्ताधाऱ्यांना झाली होती. आजही जर मराठी माणसाच्या अस्मितेशी खेळ होणार असेल, तर त्याचा जोरदार विरोध होईल,” असा इशारा त्यांनी दिला.

तसेच, त्यांनी अमित शाह यांच्या पुस्तकाच्या दाव्यालाही थेट सवाल केला. “अमित शाह यांनी जर खरोखर शिवाजी महाराजांवर ५०० पानी पुस्तक लिहिलं असेल, तर ते पाहून संजय राऊत नव्हे तर चंद्रकांत पाटलांनाच चक्कर येईल,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

पुढे बोलताना त्यांनी काँग्रेस आणि संघ या दोघांनाही लक्ष्य केलं. “जर भाजप काँग्रेसकडे मुस्लिम अध्यक्षाची मागणी करत असेल, तर संघानेही दलित अध्यक्ष नेमावा,” असा सवाल करत त्यांनी द्वेषभावनेच्या राजकारणावर सडकून टीका केली.

भाषणाचा शेवट करताना त्यांनी पुन्हा एकदा आग्रहपूर्वक सांगितले, “जर तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल खरोखर आदर असेल, तर त्यांच्या जयंतीला देशभर सुट्टी द्या. फक्त मतांसाठी ‘जय शिवाजी’ म्हणू नका, तर त्यांच्या विचारांवर कृतीतून श्रद्धा व्यक्त करा.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top