‘एप्रिल फूल’ की ‘अच्छे दिन’? आदित्य ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका

देशभरात आज ‘एप्रिल फूल’ डे साजरा होत असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी सरकारची तुलना ‘एप्रिल फूल सरकार’शी करत, ‘आपल्याकडे याला अच्छे दिन म्हणतात,’ अशी उपहासात्मक टीका केली.

‘एप्रिल फूल’ की ‘अच्छे दिन’? आदित्य ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका देशभरात आज ‘एप्रिल फूल’ डे साजरा होत असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी सरकारची तुलना ‘एप्रिल फूल सरकार’शी करत, ‘आपल्याकडे याला अच्छे दिन म्हणतात,’ अशी उपहासात्मक टीका केली.

लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित करत ठाकरे म्हणाले की, सुरुवातीला महिलांना दरमहा ₹2,500 देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात फक्त ₹1,500 दिले जात आहेत. त्याचबरोबर, ही योजना बंद होण्याच्या मार्गावर असल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘लाडका भाऊ’ योजना आधीच बंद करण्यात आली असून, सरकार नव्या योजना आणण्याऐवजी जुन्या बंद करण्याचे काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला लक्ष केले. मुख्यमंत्री एकीकडे कर्जमाफीचे आश्वासन देतात, तर उपमुख्यमंत्री त्याला फेटाळतात. त्यामुळे सरकारने दिलेली आश्वासने फक्त गाजर दाखवण्यापुरतीच असल्याचे स्पष्ट होत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top