लाडकी बहिण योजनेवर संजय राऊतांचा घणाघात – वृद्ध कलाकारांचे मानधन थांबले!

राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी या योजनेला “फसवी” संबोधत सरकारवर महिलांची व वृद्ध कलाकारांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

लाडकी बहिण योजनेवर संजय राऊतांचा घणाघात – वृद्ध कलाकारांचे मानधन थांबले! राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी या योजनेला "फसवी" संबोधत सरकारवर महिलांची व वृद्ध कलाकारांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

महिलांची सुरक्षितता आणि फसवणूक?

जागतिक महिला दिनानिमित्त बोलताना संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये देशात आघाडीवर आहेत. मंत्र्यांपासून सरकारी पक्षातील लोक त्यात सामील आहेत. पोलिसांवरही दबाव आहे. महिलांना 1500 रुपये देऊन त्यांना सुरक्षित ठरवणं ही फसवणूक आहे.

वृद्ध कलाकारांचे मानधन थांबले!

राऊत यांनी सांगितले की, काही वृद्ध कलाकारांनी त्यांच्याशी संवाद साधून लाडकी बहिण योजना लागू झाल्यापासून त्यांना मिळणारे मानधन बंद झाल्याची व्यथा मांडली. “ही राज्याची आर्थिक परिस्थिती किती बिकट आहे, याचा हा पुरावा आहे. हे राज्य कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहे आणि आर्थिक अराजक माजले आहे,” असे ते म्हणाले.

योजना फसवी? 5 लाख महिलांची नावं गायब!

संजय राऊत यांनी आरोप केला की, “सरकारने महिलांना 2100 रुपये देण्याचे कबूल केले होते, पण आता ते द्यायला तयार नाहीत. योजनेतून 5 लाख महिलांची नावं वगळली गेली आहेत. मग ही योजना फसवी नाही का?”

मुख्यमंत्र्यांची 16 लाख कोटींची गुंतवणूक फक्त कागदावर?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 लाख कोटींची गुंतवणूक आणल्याचा दावा केला होता. मात्र, राऊत यांनी या आकड्यांवर शंका घेतली. “हे फक्त कागदोपत्री आकडे आहेत. प्रत्यक्षात किती गुंतवणूक येते ते पाहावे लागेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

उद्योग-सेवा क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर – सरकार जबाबदार?

राऊत यांनी राज्यातील उद्योग आणि सेवा क्षेत्रात झालेल्या घटेसाठी सरकारला दोषी ठरवले. “एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उद्योग परराज्यात स्थलांतरित होत आहेत. तसेच, अजय अशर फॉर्म्युल्यामुळे राज्याचे नुकसान झाले आहे.

संजय राऊत यांच्या या टीकेनंतर लाडकी बहिण योजना, वृद्ध कलाकारांचे मानधन आणि राज्यातील गुंतवणूक यावर मोठे राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे. सरकारकडून यावर काय स्पष्टीकरण येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top