संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा मोठा खुलासा CID च्या आरोपपत्रातून झाला आहे. खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यामुळेच सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा आरोपपत्रात उल्लेख आहे.

घटनाक्रम : A टू Z तपशील
🔹 ८ ऑक्टोबर २०२४:
वाल्मिक कराडने अवधा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेना परळीच्या कार्यालयात बोलावले आणि धमकी दिली की, “२ कोटी रुपये द्या, नाहीतर कंपनीची कामे बंद करा!”
🔹 २९ नोव्हेंबर २०२४:
कराडने विष्णू चाटेच्या फोनवरून अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना पुन्हा धमकी दिली. सुदर्शन घुलेने कंपनीत जाऊन धमकी दिली. त्याच दिवशी हत्येचा कट रचण्यासाठी बैठक घेतली गेली.
🔹 ६ डिसेंबर २०२४:
घुले आणि सांगळेने कंपनीत जाऊन सुरक्षा रक्षकांना मारहाण केली आणि पुन्हा २ कोटींची मागणी केली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सरपंच देशमुखांना फोन करून मदत मागितली.
🔹 ७ डिसेंबर २०२४:
सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन करून चर्चा केली. कराडने सांगितले, “जो कुणी आपल्याला अडवेल, त्याचा नायनाट केला पाहिजे.”
🔹 ८ डिसेंबर २०२४:
चाटे, घुले आणि इतर आरोपी हॉटेल तिरंगा येथे भेटले आणि संतोष देशमुखांना कायमचा धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
🔹 ९ डिसेंबर २०२४:
🔸 दुपारी ३:२२ वाजता संतोष देशमुखांचे अपहरण
🔸 लोखंडी रॉड, गॅस पाईप, क्लच वायर, काठ्या वापरून अत्याचार आणि हत्या
🔸 संध्याकाळी ६:३० वाजता मृतदेह दैठाण फाट्यावर टाकून आरोपी फरार
कराड हत्येचा मास्टरमाईंड!
CID च्या आरोपपत्रानुसार, वाल्मिक कराडने टोळी तयार करून खंडणीसाठी दहशत निर्माण केली. याआधी देखील त्याने ११ गुन्हे केले असून, त्याच्या टोळीवर MCOCA अंतर्गत कारवाई झाली आहे.
हा गुन्हा आर्थिक फायद्यासाठी, वर्चस्व राखण्यासाठी, आणि लोकांमध्ये भीती पसरवण्यासाठी करण्यात आल्याचे CID ने स्पष्ट केले आहे. आता पुढील सुनावणीत काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.