बीड जिल्ह्यातील परळी येथे तब्बल 109 अज्ञात मृतदेह सापडल्याचा धक्कादायक दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. या मृतदेहांबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसून, हत्या झाल्या की त्यांना नैसर्गिक मृत्यू झाला, याबाबतही स्पष्टता नसल्याचे ते म्हणाले.

घटनांमागे राजकीय उदासीनता?
बजरंग सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार, “संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे फक्त 4-5 घटना समोर आल्या, पण प्रत्यक्षात बीड जिल्ह्यात अशा 109 मृतदेह सापडले आहेत.” यामागे स्थानिक प्रशासनाची उदासीनता आणि राजकीय हस्तक्षेप जबाबदार असल्याचे ते म्हणाले.
“राजकीय नेत्यांचा पाठिंबा असल्यानेच अशा घटना घडत आहेत,” असे नागरिकांचे म्हणणे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
आता पुढे काय?
या धक्कादायक प्रकारानंतर प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या मृत्यूंमागील कारणे, प्रशासनाची भूमिका आणि संभाव्य राजकीय संबंध याबाबत चौकशी होण्याची मागणी केली जात आहे. आता सरकार किंवा स्थानिक पोलीस यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.