पुण्यात घडलेल्या बलात्कार प्रकरणावर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड संतापले आहेत. कदम यांच्या विधानावर कडाडून टीका करत त्यांनी त्यांना लाज वाटते का? असा सवाल उपस्थित केला आहे.

विवादित विधानावरून संताप
पुण्यातील बलात्कार पीडित तरुणीबाबत योगेश कदम यांनी “ती ओरडली का नाही?” असा प्रश्न विचारला होता. त्यांच्या या विधानावर जितेंद्र आव्हाड यांनी कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी म्हणाले, “तुमच्यात लाजलज्जा आहे का?” तसेच, योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनी त्यांना योग्य सल्ला द्यावा, असेही आव्हाड म्हणाले.
योगेश कदमांवर थेट निशाणा
जितेंद्र आव्हाड यांनी कदम यांचा एकेरी उल्लेख करत, “तू मंत्री आहेस, साधा माणूस नाहीस. राज्य मंत्रिमंडळाचा प्रतिनिधी आहेस आणि तरीही असे वक्तव्य करतोस,” असे म्हणत त्यांच्यावर सडकून टीका केली.
विवाद वाढण्याची शक्यता
या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणावर अशा प्रकारची विधानं करणं असंवेदनशील असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे.