स्मशानात तिरडीवर झोपून आंदोलन! – शिवसैनिकाचं अनोखं विरोध प्रदर्शन

जालना जिल्ह्यातील केलीगव्हाण गावात एक अनोखं आणि धक्कादायक आंदोलन घडलं आहे. ठाकरे गटाच्या शिवसैनिक कार्यकर्त्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी थेट स्मशानात तिरडीवर जाऊन झोपून सरकारविरोधात प्रतिकात्मक आंदोलन केलं आहे. हे आंदोलन सध्या सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे.

आंदोलन मागचं कारण काय?
शिवसैनिक कारभारी म्हसळेकर यांचं म्हणणं आहे, “जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत माझं जीवनही स्मशानासारखं आहे.” म्हणून त्यांनी स्मशानभूमी आणि तिरडीची निवड केली. त्यांच्या मते, सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, पण सत्तेवर आल्यानंतर ते विसरून गेले.

हे पहिलं आंदोलन नाही
याआधीही कारभारी म्हसळेकर यांनी ७ फेब्रुवारी रोजी झाडावर चढून असंच लक्ष वेधणारं आंदोलन केलं होतं. अशा आंदोलनांद्वारे त्यांचा उद्देश आहे शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती, सरकारची उदासीनता आणि समाजाचं दुर्लक्ष या सर्वांकडे लक्ष वेधणं.

सरकारचं काय म्हणणं?
सध्या तरी सरकारकडून या आंदोलनावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र हे आंदोलन आगामी राजकीय चर्चांना चांगलंच खाद्य पुरवणार यात शंका नाही.

तुमचं काय मत आहे?
या प्रकारच्या प्रतिकात्मक आंदोलनांचा खरंच परिणाम होतो का? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गांभीर्याने पावलं उचलतंय का? आपलं मत नक्की शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top