संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपींनी धनंजय मुंडेंना फोन केला? मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मोठा गौप्यस्फोट करत गंभीर आरोप केला आहे. “देशमुख यांच्या हत्येनंतर आणि खंडणी प्रकरणाच्या वेळी आरोपींनी थेट धनंजय मुंडेंना फोन केला होता,” असा दावा त्यांनी केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपींनी धनंजय मुंडेंना फोन केला? मनोज जरांगेंचा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मोठा गौप्यस्फोट करत गंभीर आरोप केला आहे. “देशमुख यांच्या हत्येनंतर आणि खंडणी प्रकरणाच्या वेळी आरोपींनी थेट धनंजय मुंडेंना फोन केला होता,” असा दावा त्यांनी केला आहे.

वाल्मिक कराडची भूमिका आणि चौकशीची मागणी

जरांगे यांनी पुढे सांगितले की, “धनंजय मुंडेंच्या वतीने वाल्मिक कराड हे सर्व व्यवसाय पाहत होते.” त्यामुळे सीआयडी आणि एसआयटीने धनंजय मुंडे यांची सखोल चौकशी करावी, अशी त्यांची मागणी आहे.

फरार आरोपीला मदतीचा आरोप

फरार आरोपी कृष्णा आंधळे याला पळून जाण्यासाठी मदत करणारे धनंजय मुंडे असल्याचा आरोपही जरांगेंनी केला आहे. “हत्येच्या आठ दिवस आधीपासून ते मुंडेंच्या राजीनाम्याच्या काळापर्यंतचा कॉल डेटा रेकॉर्ड (CDR) तपासला गेला तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील,” असे ते म्हणाले.

या आरोपांमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरण नवीन वळणावर गेले असून, या प्रकरणी अधिकृत तपास सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top