संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल – ‘हे मंत्रालय वेड्यांची जत्रा आहे’

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, “हे सरकार नेमकं काय करत आहे? जनतेच्या भावनेच्या आधारावर हे सरकार सत्तेत आले, असे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे सांगतात. मात्र, डोंबिवलीत 62 इमारतींवर बुलडोझर चालवण्यात आला आणि साडेसहा हजारांहून अधिक कुटुंबे रस्त्यावर आली. याची जबाबदारी कोण घेणार?”

संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल – ‘हे मंत्रालय वेड्यांची जत्रा आहे’ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, "हे सरकार नेमकं काय करत आहे? जनतेच्या भावनेच्या आधारावर हे सरकार सत्तेत आले, असे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे सांगतात. मात्र, डोंबिवलीत 62 इमारतींवर बुलडोझर चालवण्यात आला आणि साडेसहा हजारांहून अधिक कुटुंबे रस्त्यावर आली. याची जबाबदारी कोण घेणार?"

राऊत यांनी डोंबिवलीतील आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावरही टीका केली. “बिल्डरने बनावट कागदपत्रे तयार करून राजकीय पाठबळाच्या मदतीने शासकीय यंत्रणा ताब्यात घेतली. या घरांसाठी बँकांकडून कर्जही मंजूर झाले. एका क्षणात 6500 कुटुंबं रस्त्यावर आली, पण सरकारला त्याची काहीच जाणीव नाही का?” असा सवाल त्यांनी केला.

“गौतम अदानी यांच्या प्रकल्पांसाठी सरकार मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत आहे. मग डोंबिवलीतील नागरिकांसाठी थोडी मदत केली असती, तर लोक बेघर झाले नसते. मात्र, आमदार रवींद्र चव्हाण लोकांच्या भेटीला जात नाहीत, पळून जात आहेत. हा कोणता प्रकार आहे?” असेही राऊत म्हणाले.

‘मंत्रालयात वेड्यांची जत्रा’

संजय राऊत यांनी राज्यातील मंत्र्यांवरही जोरदार हल्लाबोल केला. “या राज्यात वाय झेड करून टाकली आहे. हे वेड्यांचे सरकार आहे. मंत्रालयात वेड्यांची जत्रा भरली आहे. तिथे गोंधळ माजला असून, प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे.”

त्यांनी गृहनिर्माण विभागातील भ्रष्टाचारावर बोट ठेवत म्हटले, “गृहनिर्माण खात्यात पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. म्हाडा आणि SRAमध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक थेट रोकड दिल्यावरच होते. लवकरच कोणत्या प्रकल्पासाठी किती पैसे दिले गेले, याची माहिती मी उघड करणार आहे.”

‘मंत्रालयात अंडरवर्ल्ड सुरू आहे’

राऊत यांनी सरकारमधील अंतर्गत वादांवरही भाष्य केले. “एकनाथ शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट चालवत आहेत. त्यांच्या मंत्र्यांना फडणवीस यांचे आदेश पाळू नका, असे सांगण्यात आले आहे. ही परिस्थिती मुंबईच्या अंडरवर्ल्डसारखीच आहे. आज मंत्रालयातही अंडरवर्ल्डसारखी स्थिती निर्माण झाली आहे. समांतर सरकार चालत असेल, तर हे राज्य अराजकतेच्या दिशेने जात आहे.”

राज्य सरकारवर गंभीर आरोप करताना त्यांनी म्हटले, “मंत्रालयात फडणवीस यांना जर परिस्थिती सुधारता येत नसेल, तर हे राज्य अराजकतेच्या गर्तेत ढकलले जाईल. 56-57 आमदार ईव्हीएमच्या ताकदीवर निवडून आले, आणि आता भाजपलाच आव्हान देत आहेत.”

संजय राऊत यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top