वक्फ विधेयकावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

वक्फ सुधारणा विधेयकावरून खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आज हे विधेयक संसदेत सादर होणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

वक्फ विधेयकावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल वक्फ सुधारणा विधेयकावरून खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आज हे विधेयक संसदेत सादर होणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

फडणवीस यांच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका करताना X वर पोस्ट केली होती – “उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ठाम राहणार की राहुल गांधींच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला पाठिंबा देणार?”

या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र जी, वक्फ सुधारणा विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही. ही तुमच्या पक्षाची खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची! राहुल गांधींची आजी (इंदिरा गांधी) अमेरिकेला ताठ उत्तर देत होत्या आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता. तुमच्यात हा दम आहे का?”

शेवटच्या क्षणी भूमिका स्पष्ट होईल

विधेयकाला उद्धव ठाकरे गटाचा पाठिंबा आहे की विरोध, या प्रश्नावर संजय राऊत यांनी “आमची भूमिका शेवटच्या क्षणी दिसेल. काही गोष्टी संसदेच्या मजल्यावर ठरवाव्या लागतात,” असे सूचक वक्तव्य केले.

“हा मूर्खपणा आहे” – राऊत

वक्फ विधेयक आणि हिंदुत्व यांचा संबंध काय, असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, “हे विधेयक वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर काही उद्योगपतींना कब्जा मिळवण्यासाठी आणले आहे. शिवसेना नेहमीच प्रखर हिंदुत्ववादी राहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि विज्ञानवाद यांचे समर्थन केले. मात्र, भाजप नेत्यांचे वक्फ विधेयकावरून हिंदुत्वाचा गजर करणे हा मूर्खपणा आहे.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top