134 व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक भावनिक आणि प्रेरणादायी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, बाबासाहेबांचे त्या लढ्याला दिलेले पाठबळ, आणि आजच्या काळात मराठी एकतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?
“आपण मराठी म्हणून एकत्र आलो नाही तर, या लढ्याला काय अर्थ? बाबासाहेबांनी जातीच्या भिंती भेदून मराठी समाजाला एकत्र आणण्याचा संदेश दिला होता. आजच्या जयंतीनिमित्त आपण हीच शपथ घ्यायला हवी.”
राज ठाकरेंनी बाबासाहेबांनी 1948 मध्ये धार कमिशनला दिलेलं निवेदन आणि मुंबईच्या मराठी अस्मितेसाठी त्यांनी दिलेला ठाम पाठींबा याचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की बाबासाहेबांच्या मते, मुंबई ही मराठी भाषिकांची ओळख असलेला भाग आहे, आणि तो कोणत्याही परिस्थितीत पुसला जाऊ शकत नाही.
इतिहासाची उजळणी
- बाबासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्र समितीला जिब्राल्टरच्या खडकासारखा पाठिंबा दिला होता.
- राजगृह हे समितीच्या बैठकीचं केंद्र ठरलं होतं.
- बाबासाहेबांच्या निधनानंतरही त्यांचे अनुयायी लढ्यात पुढे होते.
चैत्यभूमी आणि सागरी सेतूवरील रोषणाई
मुंबईतील वरळी ते वांद्रे सागरी सेतू आणि चैत्यभूमी येथे भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. लेझर लायटिंगद्वारे बाबासाहेबांचा फोटो, अशोक चक्र, आणि संविधानाची प्रतिकृती सुंदरतेने सजवण्यात आली आहे.
राज ठाकरे यांची ही पोस्ट केवळ एक श्रद्धांजली नसून, ती मराठी अस्मिता आणि एकतेचा पुन्हा एकदा जागर करणारी आहे. बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून देत त्यांनी मराठी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.