योगेश कदम यांचे असंवेदनशील वक्तव्य; प्रकाश आंबेडकर यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी केली

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील अत्याचार प्रकरणावर कदम यांनी केलेले विधान असंवेदनशील असल्याचे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने त्यांना मंत्रिमंडळातून हटवावे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

योगेश कदम यांचे असंवेदनशील वक्तव्य; प्रकाश आंबेडकर यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी केली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील अत्याचार प्रकरणावर कदम यांनी केलेले विधान असंवेदनशील असल्याचे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने त्यांना मंत्रिमंडळातून हटवावे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

“मंत्र्यांचे वक्तव्य गंभीर; पोलिस आणि आरोपींना मिळते प्रोत्साहन”

अकोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, अशा दुर्दैवी घटनांवर सामान्य जनता दुःख व्यक्त करते, परंतु जबाबदार पदावर असलेले मंत्री अशी विधाने करतात, तेव्हा त्याचा समाजावर विपरीत परिणाम होतो. त्यांच्या मते, पोलिस प्रशासन आणि आरोपींना या प्रकारच्या विधानांमुळे अप्रत्यक्षपणे पाठिंबा मिळतो, त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.

“राजकीय व्यवस्थेला लकवा मारल्यासारखी स्थिती”

आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही टीका करत, राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मद्रास उच्च न्यायालयाच्या निकालामुळे बाबरी मशीद आणि शीख दंगलीच्या वेळी सरकारकडून नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे प्रशासनाने संवेदनशीलतेने निर्णय घ्यायला हवा. मात्र, सध्याचे मंत्री जाणीवपूर्वक असंवेदनशीलता दाखवत आहेत,” असे ते म्हणाले.

“सरपंच देशमुख हत्याप्रकरण आणि नीरव मोदी प्रकरणातील तपासावरही सवाल”

सरपंच देशमुख हत्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दीड हजार पानांच्या आरोपपत्रावर आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांनी नीरव मोदी प्रकरणाशी तुलना करत भारतीय तपास यंत्रणांवरही टीका केली. “इंग्लंडच्या न्यायालयात भारताने नीरव मोदीविरोधात मोठे आरोपपत्र दाखल केले, तेव्हा त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना विचारले की, तुम्ही PhD करत आहात का चौकशी? हे चौकशीचे दस्तऐवज आहेत की संशोधन प्रबंध?” असा सवाल त्यांनी केला.

“मतदान प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी होणार”

१८ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान निवडणूक प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेवर आंबेडकर यांनी प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, मतदान आणि मतमोजणी दरम्यान काही तांत्रिक त्रुटी आढळल्यास, त्या निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तपासल्या जातील आणि यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया पुढे जाईल.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top