मनसे-ठाकरे युतीची शक्यता; संजय राऊतांचा मोठा खुलासा

राज ठाकरे यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत, उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या मतभेदांना फार मोठं महत्त्व नसल्याचे सांगत, भविष्यात एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या विधानानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चर्चेची दारे खुली असल्याचे सूचित केले. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अधिक स्पष्ट भूमिका मांडली आहे.

मनसे-ठाकरे युतीची शक्यता; संजय राऊतांचा मोठा खुलासा राज ठाकरे यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत, उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या मतभेदांना फार मोठं महत्त्व नसल्याचे सांगत, भविष्यात एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या विधानानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चर्चेची दारे खुली असल्याचे सूचित केले. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अधिक स्पष्ट भूमिका मांडली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना राऊतांना विचारण्यात आले की, जर मनसेसोबत युती झाली तर महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? यावर उत्तर देताना ते म्हणाले, “हा प्रश्न अजून पुढचा आहे, सध्या त्यावर बोलण्याची गरज नाही. महाविकास आघाडी ही महाराष्ट्रासाठी एक राजकीय व्यवस्था आहे. सध्या राज ठाकरे भाजप आणि शिंदे गटासोबत दिसतात, जे आमच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या हिताचे नाही. राज ठाकरे यांचा वापर करून मराठी माणसाला अप्रत्यक्षपणे त्रास दिला जात आहे.”

तसेच राऊतांनी सांगितले की, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी सकाळी आणि रात्रीही युतीच्या संभाव्यतेबाबत चर्चा केली आहे. “आम्ही फक्त हवेत बोलत नाही. जर कोणी मुंबईत आणि मराठी उद्योजकांच्या हितावर घाव घालत असेल, तर एकत्र येणं अपरिहार्य ठरेल,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, “राज ठाकरे जर सकारात्मक भूमिका घेतील तर आम्हीही त्यांच्याशी हातमिळवणी करण्यास तयार आहोत. चांगली भूमिका आली तर ती नाकारण्याची चूक आम्ही करणार नाही,” असेही राऊतांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज ठाकरे यांनीही आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले की, ठाकरे कुटुंबासोबतचे मतभेद हे किरकोळ असून, महाराष्ट्राचे भवितव्य मोठे असल्याने एकत्र येण्याचा विचार केला जाऊ शकतो. मात्र उद्धव ठाकरे यांनी एक अट घातली आहे की, “तुम्ही भाजपा व शिंदे गटासोबत कोणतेही संबंध ठेवणार नाही, अशी शपथ घ्यावी.” त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचा मार्ग अटींवर अवलंबून असल्याचे दिसते.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, आगामी काळात या घडामोडी वेग घेतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top