पौर्णिमा आली की कोणाचा बकरा कापला जाणार? – संजय राऊतांचा शिंदेंवर अप्रत्यक्ष हल्ला

नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना (ठाकरे गट) मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. विनोदवीर कुणाल कामराच्या अलीकडील कवितेच्या माध्यमातून त्यांनी आपला संदेश स्पष्ट केला. “ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी…” अशा ओळींचा उल्लेख करत राऊत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला.

पौर्णिमा आली की कोणाचा बकरा कापला जाणार? – संजय राऊतांचा शिंदेंवर अप्रत्यक्ष हल्ला नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना (ठाकरे गट) मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. विनोदवीर कुणाल कामराच्या अलीकडील कवितेच्या माध्यमातून त्यांनी आपला संदेश स्पष्ट केला. "ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी…" अशा ओळींचा उल्लेख करत राऊत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला.

संजय राऊत म्हणाले, “आज पौर्णिमा आहे, तर कधी अमावस्या. या काळात महाराष्ट्रात एक विचित्र भीती निर्माण होते – आता कोणाचा बकरा कापला जाणार? ही स्थिती महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच पाहायला मिळाली नव्हती. महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. पण आज अंधश्रद्धेचा अंधार पसरवला जात आहे.”

राजकीय टीकेसोबतच राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवरही निशाणा साधला. “मोदी, शाह आणि फडणवीस आम्हाला हिंदुत्व शिकवतात. पण हिंदुत्व म्हणजे काय, हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे. खरे हिंदुत्ववादी तेच असतात जे प्रामाणिक असतात. जे पाखंडी आणि कपटी असतात, तेच हिंदुत्वाचं ढोंग करतात,” असे म्हणत त्यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.

राऊत पुढे म्हणाले, “तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करा, आम्ही लढायला तयार आहोत. उद्धव ठाकरे यांच्या मागे आम्ही ठाम उभे आहोत. संघर्षाची तयारी आम्ही आधीच केलेली आहे.” कार्यकर्त्यांमध्ये लढ्याचा उत्साह निर्माण करण्यासाठी त्यांनी शिवसेनेच्या बाळकड्याचा आणि छावा चित्रपटातील कवितेचा संदर्भ दिला.

या कार्यक्रमाला विरोध होईल, असा अंदाज राऊतांनी आधीच व्यक्त केला होता. ते म्हणाले, “या कार्यक्रमाला रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. भाजपने दर्गे पाडण्याच्या मोहिमा राबवल्या. पण तरीही कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. हे यश शिवसेनेच्या ठाकरेंच्या गटातील कार्यकर्त्यांचे आहे.”

या भाषणातून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतानाच आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संघर्षासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत या भाषणातून स्पष्टपणे दिसून आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top