परदेशातून देशाविरोधात आरोप करणाऱ्यांवर फडणवीसांचा निशाणा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेत दौऱ्यावर आहेत. तेथे स्थानिक उद्योजक आणि भारतीय प्रवाशांशी संवाद साधताना त्यांनी भारतीय निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान वेळ संपल्यानंतरही मतदान सुरू होते आणि संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाने उघड केलेली नाही. या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

परदेशातून देशाविरोधात आरोप करणाऱ्यांवर फडणवीसांचा निशाणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेत दौऱ्यावर आहेत. तेथे स्थानिक उद्योजक आणि भारतीय प्रवाशांशी संवाद साधताना त्यांनी भारतीय निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान वेळ संपल्यानंतरही मतदान सुरू होते आणि संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाने उघड केलेली नाही. या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीसांनी राहुल गांधींवर थेट टीका करत विचारले की, “राहुल गांधी नेमके कोणाचा अजेंडा पुढे नेत आहेत?” त्यांनी राहुल गांधींवर आरोप केला की, परदेशात जाऊन देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, जे अत्यंत निंदनीय आहे. भारतीय निवडणूक आयोग आणि लोकशाही संस्थांवर संशय घेणे, हे देशाच्या लोकशाहीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.

माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी सांगितले की, राहुल गांधी परदेशात जाऊन देशातील लोकशाही संस्थांविरोधात खोटी माहिती पसरवत आहेत. वारंवार पराभवाचा सामना केल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला असून, त्यामुळे ते अशा प्रकारची विधाने करत आहेत, असे फडणवीसांचे म्हणणे आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, जर कोणी देशभक्त असेल तर तो परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणार नाही. त्याऐवजी देशात राहून जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करेल. जनतेत विश्वासार्हता वाढवल्याशिवाय निवडणूक जिंकता येणार नाही, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. फडणवीसांनी राहुल गांधींना सल्ला दिला की, भारताची प्रतिमा मलिन करण्याऐवजी त्यांनी जनतेत जाऊन काम करावे.

राहुल गांधींनी बोस्टन येथे बोलताना म्हटले की, महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान अधिकृत मतदानाची वेळ संपल्यानंतरही लाखो मतदारांनी मतदान केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी असा आरोपही केला की, मतदानाच्या संध्याकाळी ५.३० नंतर मोठ्या प्रमाणावर मतदान झाले असून, याची आकडेवारी निवडणूक आयोगाने वेळेवर उपलब्ध करून दिली नाही. यासोबतच त्यांनी व्हिडीओग्राफीची मागणी केल्याचेही सांगितले, पण ती नाकारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. एवढेच नाही, तर आयोगाने व्हिडीओग्राफी मागणीला रोखण्यासाठी कायद्यात बदल केला, असा गंभीर आरोपही राहुल गांधींनी केला.

फडणवीसांनी त्यांच्या या आरोपांना फेटाळत सांगितले की, अशा वक्तव्यांमुळे राहुल गांधींची स्वतःचीच विश्वासार्हता कमी होत आहे. देशाच्या बदनामीने मते वाढत नाहीत, तर जनतेचा विश्वास कमावावा लागतो, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असे फडणवीसांनी ठामपणे सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top