धनंजय मुंडे राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या पहिल्या बैठकीत अजित पवारांचा स्पष्ट संदेश!

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या प्रकरणाशी संबंधित धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आले. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

धनंजय मुंडे राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या पहिल्या बैठकीत अजित पवारांचा स्पष्ट संदेश! बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या प्रकरणाशी संबंधित धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आले. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

त्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली बैठक उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अजित पवारांनी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना महत्वाचा सल्ला दिला.

अजित पवारांचा नेत्यांना इशारा

अजित पवार यांनी बैठकीत नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर आंधळा विश्वास ठेवू नये, असा कानमंत्र दिला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करू नका. जर कार्यकर्ते योग्य मार्गाने नसतील, तर त्याचा परिणाम केवळ नेत्यांवरच नाही, तर पक्षावरही होतो.”

धनंजय मुंडे प्रकरणाचा धडा

धनंजय मुंडेंच्या समोरच बोलताना अजित पवार यांनी त्यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला. “स्वावलंबी व्हा, परावलंबी राहू नका. कार्यकर्ते आणि नेते जर जबाबदारीने वागले नाहीत, तर त्याची झळ पक्षालाही बसते,” असे ते म्हणाले.

या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी ही बैठक महत्त्वाची ठरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top