जाणून घेऊयात संसद अधिवेशनांचे प्रकार: देशात वर्षातून होणाऱ्या तिनही सत्रांचे महत्त्व

नवी दिल्ली | प्रतिनिधी: देशाच्या लोकशाही व्यवस्था सुदृढ ठेवण्यासाठी संसद अधिवेशने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. संसदेत वर्षातून तीन प्रमुख अधिवेशने घेतली जातात — अर्थसंकल्पीय, मॉन्सून, आणि हिवाळी अधिवेशन. याशिवाय, विशेष परिस्थितीत विशेष अधिवेशनही बोलावले जाऊ शकते.

संसदेचे अधिवेशन म्हणजे काय?
संसदेचे अधिवेशन हा असा कालावधी असतो, ज्यादरम्यान संसदेचे कामकाज नियमितपणे चालते. कायदे, धोरणे, जनतेच्या समस्या यावर चर्चा होते. नियमानुसार दोन अधिवेशनांमधील अंतर सहा महिन्यांपेक्षा अधिक असू नये.

जाणून घेऊयात संसद अधिवेशनांचे प्रकार: देशात वर्षातून होणाऱ्या तिनही सत्रांचे महत्त्व नवी दिल्ली | प्रतिनिधी: देशाच्या लोकशाही व्यवस्था सुदृढ ठेवण्यासाठी संसद अधिवेशने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. संसदेत वर्षातून तीन प्रमुख अधिवेशने घेतली जातात — अर्थसंकल्पीय, मॉन्सून, आणि हिवाळी अधिवेशन. याशिवाय, विशेष परिस्थितीत विशेष अधिवेशनही बोलावले जाऊ शकते.

१. अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session):
साधारणतः फेब्रुवारी ते मे या कालावधीत चालणारे हे वर्षातील सर्वात महत्त्वाचे अधिवेशन मानले जाते. या सत्रात सरकार वार्षिक अर्थसंकल्प सादर करते. हे अधिवेशन दोन टप्प्यांत पार पडते. सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होते.

२. मॉन्सून अधिवेशन (Monsoon Session):
साधारणतः जुलै ते सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या सत्रात विविध कायदे आणि धोरणात्मक विषयांवर चर्चा होते. या सत्रात प्रश्नकाल आणि शून्यकाल अत्यंत सक्रिय असतो.

३. हिवाळी अधिवेशन (Winter Session):
हे वर्षातील शेवटचे अधिवेशन नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये घेतले जाते. यामध्ये जनहिताच्या मुद्द्यांवर चर्चा होते आणि कायदेविषयक कामाला गती दिली जाते.

४. विशेष अधिवेशन (Special Session):
देशात आणीबाणी किंवा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर बाबी उद्भवल्यास राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार विशेष सत्र बोलावू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top